HW News Marathi
महाराष्ट्र

जल आक्रोश नव्हे हा तर भाजप नेत्यांच्या आतला आक्रोश; धनंजय मुंडेंचा खोचक टोला

बीड | महाविकास आघाडी सरकारचा विरोधक असलेला भाजप या पक्षातील नेते हे सातत्याने राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहेत. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारविरोधात औरंगाबाद येथे ‘जल आक्रोश मोर्चा’ सुरू केला आहे. महापालिका प्रशासनाकडून शहरात पिण्याच्या पाणीपुरवठय़ाचे चोख नियोजन होत नसल्याने उन्हाळ्यात औरंगाबादकरांना पाण्यासाठी फार वणवण करावी लागत आहे. या विरोधात भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरात भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


दरम्यान, भाजपने औरंगाबाद येथे काढलेल्या जल आक्रोश मोर्चावर, राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर जल आक्रोश मोर्चा नाही, तर भाजप नेत्यांच्या आतला आक्रोश बाहेर आला आहे. असं म्हणत मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. बीडच्या अंबाजोगाई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राज्याने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दर कपाती वरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अगोदर इंधन दरवाढीची सेंचुरी करायची, नंतर कमी केली म्हणुन दाखवायचं.. सगळ्यात मोठी फसवणुक तर केंद्र सरकारने देशाच्या सामान्य जनतेची केली आहे, असे प्रतिउत्तर यावेळी धनंजय मुंडेंनी दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“११ लोकांचा मृत्यू होऊन सुद्धा सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम”

News Desk

अन्याय करणाऱ्यांच्या  नरडीचा घोट घेणारा मी पँथर – आठवले

News Desk

बागायती क्षेत्राच्या हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पवार साहेबांचा एक फोन पुरेसा – बाळासाहेब थोरात

News Desk