HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंनी परदेशातून कारखान्यासाठी पाठपुरावा केला का ? धनंजय मुंडेंचा सवाल

मुंबई | आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे, यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे नाव न घेता कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी मुंबईत पत्रकरांशी बातचीत करताना “त्यांनी पाठपुरवठा कधी केला? कसा केला?, परदेशातून केला की मंत्री म्हणून कोणी पाठपुरवठा केला हे कोणालाही समजेल,” असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांना त्यांचं नाव न घेता लगावला.

महाविकासआघाडीने भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या वैजनाथ कारखान्याला थकहमी का दिली असा प्रश्नही सध्या उपस्थित होतो आहे त्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाल, कारखान्याबाबत माझं वेगळं मत आहे. तो कारखाना उभा करण्यापासून नीट सुरू होईपर्यंत लोकनेते गोपिनाथ मुंडेबरोबरबरचं माझ्या वडिलांचे योगदान आहे. तो कारखाना बंद राहणं मनाला पटत नव्हतं. भले ही त्याचा कारखाना चेअरमन वेगळ्या पक्षाचा आहे तरी राजकारण करणार नाही.

तसेच धनंजय मुंडेंनी मराठा आरक्षणावरही आपली भूमिका व्यक्त केली. “ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही भूमिका आधीपासून आहे. ही आमची नवी भूमिका नाही. प्रचलित आरक्षणाला धक्का लागू नये हेच आमचं मत आहे,” असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन-चंद्रकांत पाटील

News Desk

शरद पवारांचा ‘तो’ अंदाज खरा ठरला, वर्तवलं होतं निकालाचं भाकित

News Desk

गुढीपाडव्यासाठी सरकारची नवी नियमावली जाहीर, जाणून घ्या…

News Desk