HW News Marathi
Covid-19

‘दिशा कायदा‘ ही केवळ घोषणाचं होती का ? चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांना सवाल!

नवी मुंबई| मुंबई| नवी मुंबईमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या महिलेचा बलात्कार झाल्याची घटना उघडकीसआली आहे. डॉक्टर असल्याचे सांगून रूममध्ये प्रवेश करीत बलात्काराचा प्रकार केल्याचा गुन्हा पनवेल मधील कोरोनासेंटरमध्ये घडला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकचं खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का? असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला आहे.क्वारंटाईन सेंटरमध्ये असे प्रकार घडत असतील तर कोरोना झालेल्या महिलांनी घरीचं मरायचे का ? त्यांना सुरक्षित कसे वाटणार ? या घटनेला फक्त तो अत्याचार करणारा पुरुष नाही तर क्वारंटाईन सेंटरचे व्यवस्थापन पाहणारे सुद्धा जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

पाहा चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पुण्यात लॉकडाऊन करा”, मुंबई उच्च न्यायालयाची उद्धव ठाकरेंना सूचना!

News Desk

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज

News Desk

राज्यांत आज ९५१८ नवे रुग्ण तर ३०९६ रुग्ण झाले कोरोनामुक्त!

News Desk