HW News Marathi
महाराष्ट्र

‘स्वाभिमानी’तील वाद मिटला, राजू शेट्टींच्या विधानपरिषद उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी दूर

मुंबई | ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’च्या राजू शेट्टींची राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लागली. बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राजू शेट्टींच्या भेटीनंतर यावर शिक्कामोर्तबही झाला. परंतु, त्यानंतर ‘स्वाभिमानी’तील अंतर्गत धुसफुस सुरु झाली. मात्र, आता ‘स्वाभिमानी’तील हा अंतर्गत वाद मिटला आहे. या पार्श्वभूमीवर, कोल्हापूरमध्ये पक्षाची एक बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ एकसंघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजू शेट्टीच्या विधानपरिषदेवरील वर्णीमुळे पक्षातील काही नाराज नेत्यांची देखील नाराजी यावेळी दूर करण्यात आली आहे.

कोल्हापूरमधील बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि सावकार मादनाईक या नाराज नेत्यांची समजून काढून नाराजी दूर करण्यात आली. सर्वप्रथम राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टींची भेट घेऊन विधानपरिषदेच्या जागेबाबत चर्चा केली होती. मात्र, शरद पवारांनी यावर शिक्कमोर्तब करणे महत्त्वाचे होते. त्यानंतर, राजू शेट्टी आणि शरद पवार यांची बारामतीतील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी भेट झाली. अर्थातच, राजू शेट्टीच्या विधानपरिषद आमदारकीवर शिक्कामोर्तब झाला. मात्र, त्यानंतर ‘स्वाभिमानी’ काही नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. यामुळे राजू शेट्टी देखील प्रचंड अस्वस्थ झाले.

पक्षातील नाराजीमुळे अस्वस्थ झालेल्या राजू शेट्टींनी त्यानंतर एक फेसबुक पोस्ट लिहून आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. आपल्या या फेसबुक पोस्टमध्ये राजू शेट्टी म्हणले कि, “समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात. पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात बंदरे विकासाची प्रचंड क्षमता; केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता – अस्लम शेख

News Desk

सध्या फोटोचे राजकारण सुरू म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांना लगावला टोला!

Seema Adhe

राज्यसरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन  कार्यवाही केली असती तर…

News Desk