HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus : आज देशभरात ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार

नवी दिल्ली | कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी आज देशात ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१९ मार्च) देशाला कोरोना व्हायरससंदर्भात संबोधित करताना जनता कर्फ्यूची मोठी घोषणा केली होती. हा जनता कर्फ्यू आज (२२ मार्च) सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. या कर्फ्यूदरम्यान देशातील जनतेने घराबाहेर पडू नये, असे आवाहन मोदींनी केले आहे. देशातील इतिहासात पहिल्यांदा कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी जनतेद्वारा कर्फ्यू लावण्या आल्याची वेळ आली.

जनता कर्फ्यूदरम्यान , नर्स, डॉक्टर, पोलीस, ड्रायव्हर, मीडिया यासारख्या अत्यावश्यक सेवांना त्यांच्या कर्तृव्य बजावल्याबद्दल जनतेनी त्यांच्या घराबाहेर येऊन घारातील वस्तू थाळ्या, टाळ्या आणि घंटा वाजवून कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन मोदींनी जनतेला केले आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालयांना टाळे असणार आहे.

मोनो आणि मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मोनो आणि मेट्रो रेल्वे सेवाही आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तर देशातील सर्व पॅसेंजर ट्रेन कालरात्री (२१ मार्च) रात्री ११ वाजेपासून बंद करण्यात आल्या आहेत. मेल, एक्सप्रेस आणि इंटरसिटी पहाटे ४ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्या आज रात्री १० वाजेपर्यंत बंद असणार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

News Desk

अधिकवेळा एटीएममधून पैसे काढल्यास दंड भरावा लागणार

News Desk

लोणीकरांसारख्या व्हिलनचा सुफडा-साफ करायला आम्हांला वेळ लागणार नाही..

Arati More