HW News Marathi
देश / विदेश

एकनाथ खडसेंना आमदार करू नका ! अंजली दमानीयांची राज्यपालांकडे धाव  

मुंबई | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, भाजप सोडताना खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर प्रचंड तोंडसुख घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर, खडसे आणि दमानिया यांच्यातील वाद अद्यापही सुरूच असलेला पाहायला मिळतो. “खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करु नये”, अशी मागणी दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता खडसेंची संभाव्य आमदारकी धोक्यात येणार का ? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

एकनाथ खडसेंनी भाजपमधून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीसांसह अंजली दमानिया यांच्यावर खडसेंनी अत्यंत गंभीर आरोप केले. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी प्रवेशदरम्यानही खडसेंनी टोकाची टीका केलीच. याच पार्श्वभूमीवर, “खडसेंना राज्यपाल नियुक्त आमदार करु नये. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीत प्रवेशदरम्यान वापरलेली टोकाची भाषा या सर्व गोष्टी लक्षात त्यांना आमदार करु नये”, असे निवेदन अंजली दमानिया यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केले आहे.

शरद पवारांनीही खडसेंना वाचवण्याचाच प्रयत्न केला !

भाजप सोडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसेंनी दमानियांवर केलेल्या टीकेनंतर “कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही”, असा थेट इशारा दिल्यानंतरही खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशदरम्यान त्यांच्यावर पुन्हा वादग्रस्त टीका केली. यावर अंजली दमानिया माध्यमांशी बोलताना म्हणाल्या कि, “राष्ट्रवादीत प्रवेशदरम्यान खडसेंनी माझ्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून खडसेंबाबतची तक्रार केली होती. मात्र, पवारांनी खडसे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…उशीरा का होईना शहाणपण आलं!”, पवारांची मोदींवर टीका

News Desk

सीबीआय संचालकांना रातोरात का हटवले? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

News Desk

कोरोनातील अपयश लपवण्यासाठी पंतप्रधानांचे काँग्रेसवर चुकीचे आरोप! – अशोक चव्हाण

Aprna