HW News Marathi
महाराष्ट्र

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर होत असलेली निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काँग्रेसची अपेक्षा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु मात्र निवडणूक झाली तरी काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

अर्ज दाखल करताना कोण होत उपस्थित?

डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, आ. अमित झनक, आ. राजेश राठोड, राष्ट्रवादीचे आ. बबनदादा शिंदे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.

अखेर राहुल गांधी यांनींही सातव कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला

राजीव सातव यांच्या निधनानंतर संपुर्ण कॉंग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंब सातव यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कपणे उभे राहील, अशी ग्वाही राहुल गांधी , प्रियंका गांधी व सोनिया गांधी यांनी दिली होती. दरम्यान , वेळोवेळी त्यांनी सातव यांच्या कुटुंबियांची चौकशी देखील केली. राजीव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा होत्या. काही महिन्यांपुर्वीच महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून प्रज्ञा यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु तेव्हा प्रज्ञा यांच्या ऐवजी रजनी पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. यावर विचारले असता, पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू, असे प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केले होते. अखेर राहुल गांधी यांनींही सातव कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या बाटलीने दूध पिण्याचा भाजपचा प्रयत्न

News Desk

“सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर पुतळा बसवा”, गोपीचंद पडळकरांची मागणी

News Desk

रत्नागिरीत शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, हाती बांधणार घड्याळ?

News Desk