HW News Marathi
महाराष्ट्र

रत्नागिरीत शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, हाती बांधणार घड्याळ?

रत्नागिरी | गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतराचं जणू वारंच आलंय. राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आधीच राजकीय वातावरण तापलं असताना आता रत्नागिरीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. खरंतर, निवडणुकांचे वारे फिरल्यापासून अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू झालं आहे. अशात दापोलीत संदिप राजपुरे आणि नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला आहे. याचा भविष्यात शिवसेनेला नक्कीच फटका बसेल अशी चर्चा आहे. अधिक माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली खेडमध्ये गेले कित्येक दिवस नाराज असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तर हे पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतकंच नाहीतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश निश्चित झाल्याचंही सांगण्यात येत आहे.राजपूरे – दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख, शंकर कांगणे – उपजिल्हा प्रमुख, विकास जाधव – युवासेना उपतालूका प्रमुख, दत्ताराम गोठल – तालूका प्रमुख, खेड या लोकांचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत शिवसेनेला मोठा धक्का बसणार याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरकरांच्या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री भेटणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना…!

News Desk

अमृता फडणवीसांच्या दाव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया

News Desk

विधानपरिषदेच्या चार जागांचा आज निकाल

News Desk