HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करणे शक्य !

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम २ वर्षात पूर्ण करणे शक्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिलमधील स्मारकाच्या जागेची आणि आराखड्याची पाहणी केल्यानंतर म्हणाले. शरद पवार यांनी आज (२१ जानेवारी) आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले. पवार पुढे म्हणाले की, “स्मारकाच्या कामाला अजून विलंब होऊ नये, याची काळजी घ्याला हवी. आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढविण्याचा निर्णय महाविकासआघाडीच्या सरकारच्या काळात झाला.”

दरम्यान “आंबेडकरांच्या स्मारकाचे केवळे २५ टक्के काम झाले आहे. अजून ७५ टक्के काम बाकी आहे. त्यामुळे जर आव्हान म्हणून हे काम स्वीकारले तर पुढील दोन वर्षात काम होणे अशक्य नाही. हे स्मारक जगभरातील लोकांसाठी आकर्षण ठरले,” असे शरद पवार म्हणाले. “आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढविण्याचा निर्णय महाविकासआघाडीच्या सरकारच्या काळात झाला. योग्य सल्ले घ्यावे, बाकीच्या सल्लांकडे दुर्लक्ष करावे,” असे ही ते यावेळी म्हणाले. तसेच “वाडियाचा विषय वेगळा असून वाडियाला निधी त्यांना मिळेल पण स्मारक झाले पाहिजे. महापरिनिर्वान दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गर्दीचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे शरद पवार पत्रकार परिषदे वेळी म्हणाले. या स्मारकासाठी ज्याचा ज्याचा हातभार लागला असेल त्यांचे आभार. बाबासाहेबांचे स्मारक देशाबाहेर देखील आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचे पवार म्हणाले.

“आंबेडकरांचे हे स्मारक महाराष्ट्राचे मुंबईचे आकर्षण झाल्याशिवाय राहणार नाही. जगभरातील सर्व बौद्ध लोकांचे हे या ठिकाणी येतील. शिवाजी पार्कमध्ये चैत्यभूमी आणि बाजूला आंबेडकरांचे स्मारक हा दुहेरी संगम आहे. या देशातील प्रत्येक नागरिक महामानवाच्या दर्शनासाठी येईल,” असेही शरद पवार म्हणाले. स्मारकाच्या पाहणी वेळी शरद पवारांसोबत अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेना-भाजपमध्ये युतीचा तिढा अखेर सुटला ?

News Desk

भाजप नेत्यांना केदारनाथला जाऊन डोकं थंड करायची गरज; संजय राऊतांचा टोला

Aprna

राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या अंतिम निर्णय, सर्वोच्च न्यायालयात असा झाला युक्तीवाद

News Desk