HW News Marathi
महाराष्ट्र

ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर होणार का ?

सांगली| महाराष्ट्रात अनेक गावात अतिशय भीषण दुष्काळ असल्याने दुष्काळ प्रतिबंधासाठी केंद्र सरकारची वाट न बघता राज्य सरकारने दुष्काळाच्या प्रतिबंधसाठी उपायोजना करावी. तसेच सध्या बहुतेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत असल्याने ३१ ऑक्टोबरनंतर १७२ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जत येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी हि माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात हजार गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण झाली आहेत,मात्र जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. ज्या तालुक्यात ३१ टक्क्यापेक्षा जास्त दुष्काळ असल्यास सवलती जाहीर कराव्यात. तसेच प्रशासकीय इमारत, नवीन बसस्थानक, म्हैसाळचे पाणी, विभाजन या तालुक्याच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात अशी मागणी खा. संजय पाटील यांनी केली आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर लाईट बिल, पाणी पट्टी, जनावरांचा चारा, शालेय फी, टँकर या सवलती राज्यसरकार समोर मांडण्यात आल्या आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला करोडो रुपये… महेश टिळेकरांचा संताप

News Desk

12 आमदारांचा तिढा सुटणार? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलवलं भेटीला!

News Desk

राज्यसेवा परीक्षा आणि सर्व भर्ती प्रक्रिया पुढे ढकलण्याची संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती

News Desk