HW News Marathi
महाराष्ट्र

उद्या होणारा दसरा मेळावा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा – पंकजा मुंडे

मुंबई। उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा नाही. कोणत्याही वर्गाचा नाही. हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा मेळावा आहे, असं सांगतानाच या मेळाव्याला येणारा कार्यकर्ता हा विचारांची ऊर्जा घेऊनच जातो, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं.उद्या बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे या संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मेळाव्याच्या तयारीबाबत पंकजा मुंडे यांनीमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. दरवर्षी दसरा मेळावा आगळावेगळा असतो. हा मेळावा लोकांच्या आदेशावरून आणि आग्रहावरून होत असतो. यावेळचं स्वरूप किती सुंदर आणि देखणं आहे हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. मला विश्वास आहे मेळावा आगळावेगळा असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

माझा रोख हा वैयक्तिक कुणावर नाही ज्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या आहेत त्यांच्यावर

काम न करणाऱ्यांना घरी बसवा असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यावरूनही त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. या विधानामागे माझा रोख कुणाकडेच नव्हता. जे लोक सत्ताधारी आहेत. प्रशासन आणि सत्तेवर ज्यांचं राज्य आहे त्यांच्यापुरताच हा रोख होता. जेव्हा आपण काही मागत असतो तेव्हा नेमकं कुणाला मागतो तर जे निर्णय प्रक्रियेत आहेत त्यांना मागतो. केवळ बीडमध्ये नाही तर राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अत्याचाराची दाहकता भीषण आहे. त्यामुळे माझा रोख हा वैयक्तिक कुणावर नाही. ज्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या आहेत त्यांच्यावर आहे, असं त्या म्हणाल्या.

माझ्या राजकारणाचा मूलमंत्र आहे

बीडमध्ये दसऱ्याला भगवान बाबांच्या भक्तीचा मेळा जमतो. दरवेळी हा व्हिडीओ उत्सफूर्तपणे येतो. हृदयातून निघालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचतो. हीच खरी नेतृत्वाची ताकद असते. ही भक्तीची परंपरा आहे, ती नैसर्गिक आहे. लोकांनी मला आदेश द्यायचा आणि मी स्वीकारायचा हा माझ्या राजकारणाचा मूलमंत्र आहे. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं… माझ्या मनात ही चार वाक्य आली आणि त्याचा व्हिडीओ झाला. लोकं खूप मोठ्या संख्येने तो व्हिडीओ बघत आहेत, असं त्या म्हणाल्या.

प्रीतम मुंडेंकडून तयारीचा आढावा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचणारच नाही अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर वॉटर प्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रीतम मुंडे या भगवानगडावर येत आहेत. या परिसरात सुरू असलेल्या दसरा मेळाव्याचा त्या आढावा घेत आहेत. तसेच काही सूचनाही संबंधितांना देत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

११ वेळा आमदार राहीलेले शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन …

News Desk

मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश…!

News Desk

अनिल देशमुखांची ED कोठडी आज संपणार!

News Desk