HW News Marathi
देश / विदेश

“मोदींचा चेहरा होता, तसाच बाळासाहेबांचा देखील होता, त्याचा दोन्ही पक्षांना फायदा झाला”, शिंदेंचं पाटलांना प्रत्युत्तर

जळगाव | नरेंद्र मोदींचा चेहरा वापरल्यामुळेच शिवसेनेचे ५६ आमदार भाजपच्या जीवावर आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींचा चेहरा होता, तसा बाळासाहेब ठाकरे यांचाही चेहरा यावेळी होता. दोन्ही पक्षांची युती असल्याने त्याचा दोन्ही पक्षांना फायदा झाला आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे काल (१० जुलै) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

“नरेंद्र मोदींचा चेहरा होता, तसाच बाळासाहेबांचा देखील होता अन् त्याचा दोन्ही पक्षांना फायदा झाला”

मुंबई: पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याचा ठपका ठेवत भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. यावरुन आपली प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी संपूर्ण दिवस तोंडाला पट्टी बांधून सभागृहात बसले होते. कुठल्याही विषयाबाबत चर्चेतून तोडगा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्याऐवजी केवळ घोषणा आणि निदर्शने केली म्हणून आमच्या आमदारांचे निलंबन केले, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

विधानसभेची समन्वयातून तोडगा काढण्याची परंपरा या सरकारने मोडीत काढली, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिवसेनेचे ५६ आमदार आणि १८ खासदार निवडून आले आहेत. आज तेच आमदार सभागृहात भाजपचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून प्रखर संघर्ष करू, असा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानंतर मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, याविषयीच्या राजकारणात आपण जाऊ इच्छित नाही. मात्र युती असल्याने नरेंद्र मोदींचा चेहरा होता, तसाच बाळासाहेब ठाकरे यांचा देखील चेहरा होता आणि त्याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे हे शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कोरोनाच्या कठीण काळातही आघाडी सरकारने कशा प्रकारे चांगले काम केले, हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यामुळे आम्ही विकास कामांवर लक्ष देत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर आणि त्यांच्या जावयावर ईडीच्या कारवाई संदर्भात बोलताना एकनाथ शिंदे यांनी अतिशय सावधपणे प्रतिक्रिया दिले. ‘हा चौकशीचा भाग आहे. त्यामुळे यामध्ये आपण आताच बोलणं योग्य ठरणार नाही’, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. यावरुन आपली प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी संपूर्ण दिवस तोंडाला पट्टी बांधून सभागृहात बसले होते. कुठल्याही विषयाबाबत चर्चेतून तोडगा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्याऐवजी केवळ घोषणा आणि निदर्शने केली म्हणून आमच्या आमदारांचे निलंबन केले होते.

विधानसभेची समन्वयातून तोडगा काढण्याची परंपरा या सरकारने मोडीत काढली”, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. याचवेळी बोलताना, “नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिवसेनेचे ५६ आमदार आणि १८ खासदार निवडून आले आहेत. आज तेच आमदार सभागृहात भाजपचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून प्रखर संघर्ष करू.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माल्ल्यावर कारवाई निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

News Desk

‘खेलरत्न पुरस्कारचं नामकरण ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ’, संजय राऊतांची मोदींवर टीका

News Desk

गोव्यात सोपटेंनी मराठी तर शिरोडकरांनी कोकणी भाषेतून घेतली शपथ

News Desk