HW News Marathi
महाराष्ट्र

पक्ष दोषी नसतो, नेतृत्व करणाऱ्याचे चुकते !

मुंबई | राज्यात सत्ता स्थापनेची संधी गेल्यानंतर भाजप अंतर्गत नाराजीचा सुर आवळला जात आहे. राज्यातील पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे वेळोवेळी पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुडेंच्या फेसबुक पोस्टनंतर त्या पक्ष सोडण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे भाजपविरोधी लोक जबाबदार असल्याचे वक्तव्य खडसेंनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलातना केले होते. दरम्यान, त्यानंतर आज (३ डिसेंबर) भाजप नेते विनोद तावडे आणि खडसेंची भेट घेतली. यानंतर खडसेंनी पंकजा मुंडेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान या भेटीनंतर खडसेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, भाजपमधील पक्षविरोधी लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आपण पक्षाकडे केली आहे. पक्षातील अशा लोकांबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. यंदाच्या विधानसभेत पंकजाताई आणि रोहिणीताई यांचा पराभव याच लोकांमुळे झाल्याचा दावा खडसेंनी केला आहे. त्याचप्रमाणे पक्ष दोषी नसतो, नेतृत्व करणारे चुकते, असे सूचक विधान देखील खडसेंनी केले आहे.

खडसे पुढे म्हणाले की, दुदैवाने बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न होतोय. ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारेच पराभूत झाले. तसेच तावडे-मुंडेंच्या भेटीमागचे कारण सांगताना खडसे म्हणाले की, कौटुंबिक कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी तावडे आणि मुंडेंची भेट घेतल्यानेच माहिती त्यांनी माध्यमांना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज १ वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपीचे कुटुंबिय करणार उपोषण

News Desk

थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, आज कोणता बॉम्ब फुटणार?

News Desk