HW News Marathi
महाराष्ट्र

‘माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही’, खडसे पुन्हा भाजपवर बरसले

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावया विरोधात ईडीने कारवाई केल्यामुळे आता ते भाजपवर संताप व्यक्त केला आहे. ‘किमान माझ्या जावयाला तरी त्रास द्यायला नको होता.’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपवर बरसले आहेत. मागील काही महिन्यांपासून खडसेंच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या जावयाला देखील ईडीने तुरुंगात टाकलं आहे. याच गोष्टीवरुन खडसेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ते जळगावात बोलत होते.

माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही

‘भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला कळले तरी की माझी चौकशी का सुरू आहे. पण अशा रितीने त्रास देणे योग्य नाही. जावयाला तरी असा त्रास द्यायला नको होता.’

‘माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही. त्यांनी आयुष्यात राजकारणात काहीही केलेले नाही. तो गेली 20 वर्षे ब्रिटनमध्ये नोकरी करतोय. पण त्यांना विनाकारण छळले जात आहे. त्यांचा या प्रकरणात व्यवहार फक्त 2 कोटींचा आहे. त्यासाठी देशाची सर्वोच्च यंत्रणा ईडी चौकशी करतेय.’

थाभाऊने पक्ष बदलला म्हणून तुम्ही कितीही छळ करा, हा काही पहिल्यांदा घडलेला प्रकार नाही. मी आता स्वतः अशी मानसिकता करून घेतली आहे की जे होईल ते होईल. मी काही केलेले नाही, म्हणून काय होईल ते पाहू. नाथाभाऊ मजबूत माणूस आहे. तुम्हाला किती बदनाम करायचे तितके करा, पण मी काही झुकणारा किंवा घाबरणारा नाही.’

‘चलते रहना’

‘ईडी माझ्या मागे लागली म्हणजे माझा चेहरापण पडणारा नाही. ‘चलते रहना’ अशीच माझी मानसिकता. यांनी कितीही बदनामी केली तरी नाथाभाऊ कसा आहे, हे जनतेला 40 वर्षांत माहिती नाही का? ‘जाहिल यू ही बदनाम है, हमको गम से क्या काम है, ये मुस्कुराती जिंदगी जिंदादिली का नाम है’, असा शेर म्हणत खडसेंनी भाजपला जोरदार टोला लगावला.

ज्याने भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केला आहे, त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी

‘ज्याने भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केला आहे, त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी, या मताचा मी आहे. पण ज्या माणसाच्या चार वेळा चौकश्या झाल्या, सीबीआय, इन्कम टॅक्सने केलेल्या चौकशीत काहीही तथ्य निघाले नाही. तरी नंतर अशा पद्धतीने छळणे योग्य नाही. हे निव्वळ राजकारण आहे, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वक्फ मालमत्तेची माहिती द्या – प्रधान सचिव श्याम तागडे

News Desk

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत यांचा झाला विजय ?

swarit

मुंबई पोलीस कंगनाला त्वरित अटकही करु शकतात  – उज्वल निकम

News Desk