HW News Marathi
महाराष्ट्र

“१० दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि…”,जळगावच्या विजयाचा खडसेंनी सांगितला फॉर्म्युला⁩

जळगाव | भाजपा नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून महापालिकेत भाजपच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश मिळालं आहे. २७ नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसलेल्या भाजपने जळगाव महापालिकेमधील सत्ता गमावली आहे. ‘एमआयएम’च्या ३ नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केलं असल्याने जळगाव पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. दरम्यान, एकहाती शिवसेना कशी जिंकली याबद्दल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माहिती सांगितली आहे.

जळगाव महानगर पालिकेमध्ये सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का देत शिवसेनेनं भगवा फडकावला आहे. हा भाजपसोबतच जळगावमध्ये भाजपचे महत्वाचे जे नेते आहेत गिरिष महाजन त्यांचं हे मोठं अपयश म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांचा हा मोठा विजय झाला असल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेत हा विजय कसा जुळवून आणला? याचा फॉर्म्युला काय होता? याची माहिती एकनाथ खडसे यांनी सांगितला आहे. गेल्या १० दिवसांत फासे फिरल्याचं त्यांनी म्हटलं आहे!

एकनाथ खडसे काय म्हणाले?

भाजपची एकहाती सत्ता असून देखील जळगावात भाजपला पराभवाची धूळ चारण्याचा सगळा प्लॅन गेल्या १० दिवसांत जुळून आल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. शिवाय, या प्लॅनबद्दल फारसं कुणाला काही माहिती नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत. “जळगावात भाजपाची एकहाती सत्ता होती. पण कामं होत नसल्यामुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनता देखील नाराज होती. त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावाच लागला नाही”, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, जळगाव महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेविषयी देखील एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. “१० दिवसांपूर्वी याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन. नुसतं आवाहन केलं, तर नगरसेवक जमू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटूनही गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले २२ होते, शिवसेनेचे १५ होते आणि एमआयएमचे ३ आमच्याकडे आलेच होते”, असं खडसेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपचे जळगावमधील नेते गिरीश महाजन यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये गर्विष्ठपणा आहे. नगरसेवकांना तुच्छ लेखणं, स्थानिक मागण्यांकडे दुर्लक्ष करणं हे होत होतं. त्यामुळे नगरसेवकांना फार आग्रह करावाच लागला नाही. यापैकी बरेच जण महिन्याभरापासून माझ्यामागे फिरत होते. गिरीश महाजनांविषयी प्रचंड नाराजी होती” असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे गिरिश महाजनांना त्यांच्या बालेकिल्यात पराभवाला समाेरं जावं लागल्याने त्यांच्याकडून याची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही उद्धवशाही नसून बेबंदशाही, नारायण राणेंचा गंभीर आरोप

News Desk

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; उद्या होणार पुढील युक्तीवाद

Aprna

जनतेची लूट, विकासकामात तूट, जाहिरातबाजी आणि उधळपट्टीला सूट! अशोक चव्हाण

News Desk