HW News Marathi
महाराष्ट्र

“ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग निघत नाही तोपर्यंत निवडणूका नको,” – नवाब मलिक

मुंबई। ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका नको, अशी भूमिका विरोध पक्ष असलेल्या भाजपने लावून धरली आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनंही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग निघत नाही तोवर कोणत्याही निवडणुका नको अशी भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्र्यांकडून त्यांच्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिलीय.

ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका नको

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मंत्र्यांच्या विभागाचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. ईडी कारवाईबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. ईडी कारवाई ही ठरवून होत आहे. भाजप कटकारस्थान करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या जिल्ह्याची स्थिती पाहून कशा लढायच्या हे ठरवलं जाईल. लोकांना उत्तेजित करण्याची भूमिका घेणं योग्य नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका नको ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक यांनी सांगितलं. तसंच येत्या 15 दिवसांत महामंडळाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी दिलीय.

साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये 10 पालिकांची मुदत संपणार आहे तर 100 नगरपालिकांची मुदत संपत आहे. या दरम्यान कोविडची परिस्थिती पाहता निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सर्वच्या स्थानिक निवडणुका या फेब्रुवारीमध्ये होतील हे निश्चित झाले आहे.मुंबई, ठाणे, पुण्यासह 17 महानगर पालिका, 27 जिल्हा परिषदा 300 नगरपालिका, 295 पंचायत समित्या आणि 21 जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे, एका प्रकारेही मिनी विधानसभेची निवडणूक समजली जाणार आहे. त्यामुळे शरद पवार यांनी सर्व नेते आणि मंत्र्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जागतिक आरोग्य दिनानिमित्त उद्या ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम

News Desk

सचिन वाझेंच्या चौकशीसाठी CBIला दिली परवानगी

News Desk

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना !

News Desk