HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणुका होतील त्यावेळी देशातील चित्र बदललेले दिसेल !

मुंबई। हा चार राज्याचा प्रश्न नाही तर यापुढे लोकांना ज्याठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आणि ज्यावेळी निवडणुका होतील. त्यावेळी देशातील चित्र बदललेले दिसेल असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन स्वीकारण्यासाठी आलेल्या शरद पवारांनी मिडियाशी बोलताना आपली भूमिका मांडली. काल(११ डिसेंबर) चार राज्यांचा लागलेला निकाल पाहता लोकांनी भाजपवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कालचे जे निकाल आले आहेत त्याबद्दल भाजप सोडून इतर पक्ष यांच्यामध्ये समाधान आहे.भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा पर्याय महत्वाचा आहे, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

सुप्रिम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. आरबीआयच्या गव्हर्नरची नेमणूक सत्ताधारी पक्षांनी केली होती, त्याचाही राजीनामा त्यांनी दिला आहे. सीबीआयमधील वाद समोर आला आहे. काही मर्यादा ठेवायला पाहिजे. पंतप्रधानांनी जी काही आश्वासने दिली होती. ती या निवडणुकीत ते विसरले आणि फक्त एक कुटुंब मांडत राहिले. ज्यांनी पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांना पाहिले नाही. परंतु तरीही एका कुटुंबावर हल्ला करत राहिले त्याचा परिणाम असा निघाला आहे. दरम्यान त्यांच्यावर हल्ले का करण्यात आले याबाबत लोकांमध्ये प्रश्न होता, असेही शरद पवार यांनी सांगितले. देशाच्या संविधानावर हल्ला झाला. त्याबद्दलही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी, आदिवासी यांचा फटका बसेल असे वाटले होते. मात्र शहरी भागात ही ५० टक्के त्यांना फटका बसला आहे. ही परिवर्तनाची सुरुवात आहे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

काँग्रेसने नेतृत्व नवीन पिढीकडे सोपवलं ते लोकांनी मान्य केले आहे. आघाडी नाही मात्र देशपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी आपले मतभेद विसरुन एकत्र येण्याचे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले. तिसरी आघाडी किंवा युपीए ३ असे काही नाही, असणार मात्र देशपातळीवरील प्रश्नासाठी आपापसातील मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे अशी स्पष्ट भूमिकाही खासदार शरद पवार यांनी मांडले. दरम्यान निवडणूकीपर्यंत भाजप नेतृत्वाला ठोकण्याचे काम शिवसेना करेल आणि निवडणुकीमध्ये एकत्र येतील याबाबत शंका नाही, असा टोलाही शरद पवार यांनी शिवसेनेला लगावला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UPA चे अध्यक्षपद भूषविण्यात मला रस नाही! – शरद पवार

Aprna

पटोले वाद आता राहुल गांधींच्या दरबारात?, थोरात, राऊत दिल्लीत दाखल

News Desk

मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री !

News Desk