HW News Marathi
महाराष्ट्र

अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही – ऊर्जामंत्री

मुंबई | राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्याचा परिणाम हा आर्थिक बाबींवर मोठ्या प्रमाणात झाला. उद्योग बंद असल्याने लोकांना पगार मिळत नव्हता मात्र वीजबिल मोठ्या आकड्यांचे आकारले गेल्याने ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले.
बिलाच्या चिंतेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
लॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी काल (१४ जुलै) मंत्रालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती.
वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारींची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकीत वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान सुरु 

News Desk

ED अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी! – गृहमंत्री

Aprna

#COVID19 : तबलिघी जमातीच्या कार्यक्रममुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग, आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk