HW News Marathi
महाराष्ट्र

अमित शहांच्या कौशल्याची आम्हीही आतुरतेने वाट बघतोय !

मुंबई | राज्यात शिवसेना-भाजपला बहुमत मिळाले आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल लागून १३ दिवस होऊन ही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समान वाटपावरून हटून बसली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मागच्या काही काळात अनेक राज्यांत बहुमत नसतानाही सरकारे स्थापन केली, असा सवाल एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी रविशंकर शर्मा यांनी पत्रकार परिषद विचारला. “या सत्तास्थापनेच्या कौशल्याची तुमच्याप्रमाणे आम्हीही आतुरतेने वाट पाहात आहोत,” असे उत्तर देत पवारांनी शहांना टोला लगावला.

जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू,” अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे. पवार यांनी आज (६ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यावर चर्चा केली. “२५ वर्षे युतीत सडले म्हणतात तरी एकत्र लढले,” असा चिमटाही पवारांनी शिवसेनेला यावेळी काढला.

भाजप-शिवसेनेला जनतेने कौल दिला आहे. शिवसेना आणि भाजपने मिळून सरकार स्थापन करावे, मत पवारांनी मांडले आहे. पवार म्हणाले, संख्याबळ असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सरकार स्थापन केले असते. संजय राऊत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊ आले नाही, पवारांनी त्यांच्या भेटीवर पवारांनी प्रतिक्रिया दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ पुन्हा वाढणार, ‘हा’ आमदार करणार राष्ट्रवादीत एन्ट्री!

News Desk

मुख्यमंत्र्यांची घोषणा सिडको जमीन व्यवहाराला स्थगिती

News Desk

जरंडेश्वरचा मालक कोण?, सोमय्यांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं उत्तर!

News Desk