HW News Marathi
देश / विदेश

घडामोडींना वेग ! अजित पवार, जयंत पाटलांसह शरद पवारांची दिल्लीत तातडीची बैठक

मुंबई । ठाकरे सरकारला महाराष्ट्र भाजपने चांगलेच कोंडीत पकडले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे होत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकार अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परमबीरसिंग यांनी या पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज (२१ मार्च) दिल्लीत आपल्या पक्षातील महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

शरद पवारांनी दिल्लीत बोलावलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती मिळत आहे. परमबीरसिंग यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर पुढची रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अनिल देशमुखांना गृहमंत्री पदावर हटविण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय आज दिल्लीत होणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांनी अजित पवार, जयंत पाटील यांना दिल्लीत 6 जनपथवर तातडीचे बोलावणे धाडले आहे. संध्याकाळी 5 वाजता शरद पवारांसोबत ही खलबते होणार असून नेमका काय निर्णय घेतला जातो, पुढची रणनीती काय ठरते ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अबब… चार वर्षात मोदींचे ऐवढे परदेश दौरे

swarit

“कपिल देवपेक्षा इम्रान खान खूप भारी क्रिकेटर होता”-माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक

News Desk

नोटाबंदीचा निर्णय हा जनतेसाठी धक्का नव्हता, आम्ही जनतेला सावध केले होते !

News Desk