HW News Marathi
महाराष्ट्र

तासगाव शहर अतिक्रमणाच्या विळख्यात

सांगली | तासगावच्या पुणदी रोडवर गॅरेज दुकानदारांकडून तसेच तासगाव शहरात दूकानदार, पानपट्टी हातगाडे यांच्याकडून प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. पुणदी रोडवर तर स-हास गँरेज आहेत. वाहने रोडवर दुरुस्त करतात. मार्केट यार्ड चौक येथे वडापावचे गाडे असल्यामुळे पार्कींग कुठे करायची असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

बस स्थानक चौकातही गाडे असल्यामुळे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. बागणे चौक येथेही केळी व्यवसाय व कपडे व्यवसायिकांनी अतिक्रमण करुन आपला धंदा थाटलाय परीणामी तेथे वाहतुक कोंडी होत असते. गणपती मंदिर येथे ज्युसचे गाडे असल्याकारणाने वाहने नीट न लावल्यामुळे या ठिकाणी ही वाहतुक कोंडी होत असते.

वाहतुक पोलिसांना विचारले असता ते नगरपालिकेने पांढरे पट्टे चुकीचे मारल्याने वाहतुक कोंडी होते अशी उत्तरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात येतात. तासगाव शहरात मुळातच पार्किंग व्यवस्था नगरपालिकेने नीट केलेली नाही. काही दुकानदारांनी गटारांवर अतिक्रमण करुन आपला माल रोडवर ठेवला आहे व बोर्ड ही रोडवर लावले आहेत. त्यामुळे ही वाहतुक कोंडी होत असते. ६ महिन्यांपूर्वी तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी व्यापा-यांची बैठक घेतली पण ती फैल गेली आहे. वाहने ही कोण कुठे ही आपल्या मन मर्जीने लावत आहेत.

ट्रॅव्हल्स चौकात अनअधिकृतपणे उभ्या करतात. वाहनांचे अतीक्रमण झाल्याने वाहतुक कोंडी होत असते. नगरपालिकेचे नवीन मुख्याधिकारी गणेश शिंदे व तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्या कडून तासगावकरांना खुप अपेक्षा आहेत. त्यांनी अतिक्रमण विरोधी पथक नेमण्याची गरज आहे. रस्त्यावर गॅरेज दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या आहेत. त्या हटविण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथकाकडून दूकानदारांचे गटारीवरील अतिक्रमण, हातगाडे, दुकानांसमोरचे बोर्ड यांचे अतिक्रमण काढावे अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“निष्ठावान कलातपस्वी हरपला”; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Chetan Kirdat

संजय राठोड मंगळवारी सहकुटुंब पोहरादेवीत येणार, पत्रकार परिषद घेणार?

News Desk

तुकाराम मुंढेचा पहिल्याच दिवशी धक्का

News Desk
मुंबई

बोटीतून गरोदर महिलेला रुग्णालयात पोहचवले

News Desk

वसई | मुंबईसह उपनगरात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. वसई पूर्वेकडील मिठागरात ४०० जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी वसईतील परिस्थिती पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा हॉटेल ग्रीन या ठिकाणी एका गरोदर महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या होत्या. या महिलेला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. अग्निशमन दलाने बोटीच्या मदतीने या महिलेला रुग्णालयात दाखल केले. आशा जीवन डिसूजा असे या गरोदर महिलेचे नाव असून वसईतील मथुरा परिसरामध्ये ती राहते.

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणपती मंदिराच्या बाजूला असणाऱ्या गार्डनमध्ये काम करणारे १० लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. या सर्वांना अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. यात आसाराम कोळेकर, विनोद जगताप आणि त्यांची पत्नी, कैलास आणि लहान मुले यांचा समावेश होता.

Related posts

आज मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी 

News Desk

सीएसएमटी जवळील ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू

News Desk