HW News Marathi
महाराष्ट्र

पर्यावरण पूरक गणेश मुर्ती, सांगली जिल्ह्यातला आदर्श उपक्रम

सांगली | तासगांव तालुक्यातील कवठेएकंद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदर्श कलाशिक्षक व राष्ट्रीय रंगावलीकार सागर कृष्णा जाधव यांनी शाडूमातीपासून श्री गणेशमुर्तीच्या विविध रुपातील शिल्पकला साकार करुन सुमारे ३९९ विद्यार्थ्यांना या मुर्तीकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. शाडूमातीच्या मुर्ती हि पाण्यामध्ये लगेच विरघळते व पाण्याचे प्रदुर्शन होत नाही व या मुर्तीवर वाॕटर कलर्स वापरले तर ते कलर्सचा पाण्यामध्ये कोणताही दुष्परिणाम होत नाही यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी सदैव जाधव तत्पर असतात.

शाडू मातीपासून गणेश मुर्ती शिकवत असताना उपस्थित मुलामुलींसाठी भावी बाल कलाकारांसाठी गणेश चतुर्थीनिमित्त नेत्रदिपक अशी एक मेजवानीच होती. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक सुरेखा पाटील यांनी जाधव यांचे अभिनंदन केले यावेळी शाळेचे शिक्षक रघुनाथ थोरात व सर्व शिक्षक / शिक्षिका वृंद व विद्यार्थी / विद्यार्थीनी उपस्थित होत्या. जाधव यांनी आजअखेर चिञकला,रांगोळी ,शिल्पकला, माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावर जनजागृती केलेली आहे .

यामध्ये एकोफ्रेंडली गणेश मुर्ती,पर्यावरण वाचवा, दारुबंदी,स्ञी भ्रूणहत्या,मुलगी वाचवा अशा अनेक उपक्रमाचा समावेश आहे.प्रत्येक संकष्टीला तासगांवच्या श्री गणेश मंदिरात सुमारे चार ते पाच वर्षे झाली अविरत अखंड प्रबोधनात्मक रांगोळीच्या माध्यमातून सेवा केली कुणाकडूनही एक रुपया न घेता .आदर्श कार्यकर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वाच्या असलेल्या जाधव यांना यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.डिझीटलच्या दुनियेत चित्रे व पोस्टर प्रदर्शन रांगोळी , मातीच्या मुर्ती लुप्त होताना दिसत आहेत. मात्र या कला जाधव जपत आहेत. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आईवडीलांच्या डोळ्यांतून निघणाऱ्या आनंदाअश्रुंसाठी जगायचे असते अशा ध्येयाने प्रेरीत झालेल्या आदर्श कलाशिक्षकांची गरज आज संपूर्ण देशाला आहे.

जाधव यांनी प्रतिकुल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने कलाक्षेत्रात आजवर चौफेर घौडदौड सुरु ठेवली आहे . समाजकार्यातून चांगल्या समाजाची निर्मिती ,प्रत्येक भारतीय जाज्ज्वल्य देशप्रेमाने पेटून उठावा यासाठी कलाशिक्षक सागर जाधव यांची चाललेली धडपड खरंच कौतुकास्पद आहे .आपल्या या अखंड ,अभेद्य धडपडीस सदैव यश येईल असा आमचा विश्वास आहे एक आदर्श आणि कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्व म्हणून भावी युवापिढी आपला आदर्श घेतच राहील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिस रकमेत पाचपट वाढ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो – विनायक राऊत

News Desk

मुंबईतील निर्बंधात शिथिलता; पहा काय आहेत नवे नियम

News Desk
मुंबई

जातीय सलोखा वाढवण्यासाठी जमाते इस्लामीची मोहिम, कोरेगाव भीमाला भेट देणार

News Desk

मुंबई : समाजातील प्रत्येताच्या हितासाठी राज्यात व देशात शांतता प्रस्थापित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कोरेगाव भीमा येथील प्रकरणानंतर राज्यातील जातीय सलोखा वाढवण्यासाठी व शांततेसाठी न्यायाच्या लढाईमध्ये सोबत राहण्याची ग्वाही जमात ए इस्लामी तर्फे बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. जमात तर्फे 12 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत शांती व सद्भावनेसाठी मोहिम राबवण्यात येणार आहे. इस्लाम, विकास व शांती या विषयावर यामध्ये प्रबोधन करण्यात येईल, अशी माहिती जमात ए इस्लामी चे राज्याचे सचिव अस्लम गाझी यांनी दिली.

यावेळी डॉ सलीम खान, हुमायुन शेख, हफीजुल्ला फारुकी, इम्तियाज शेख, मुजीब आदिल व पदाधिकारी उपस्थित होते. मराठा व दलित समाजामध्ये याबाबत मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोरेगाव भीमा येथे जाण्याचा मनोदय यावेळी जाहीर करण्यात आला.

जमात च्या या मोहिमेमध्ये जमैतुल उलेमा, सुन्नी समाज या विविध मुस्लिम संघटनांसह बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटना सक्रिय सहभाग घेणार आहेत. या संघटनांना सोबत घेऊन सामाजिक एकात्मतेसाठी किमान समान कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व ऊर्दू अशा चार भाषांमध्ये याबाबत प्रसिध्दीपत्रके प्रकाशित करण्यात आली आहेत. राज्यात सुमारे 20 हजार सक्रिय सभासदांच्या माध्यमातून ही मोहिम राबवण्यात येणार आहे. मुस्लिम समाजाबाबतचे सर्वसामान्य जनतेमधील गैरसमज दूर होण्यास या मोहिमेचा लाभ होईल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती, निराशा व द्वेषभावना समाप्त करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागरण केले जाईल.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे 600 हून अधिक ठिकाणी कार्यक्रम होतील, त्यासाठी 14 लाख पेक्षा जास्त पत्रिकांचे वितरण केले जात आहे. सोशल मीडियावरील विविध साईटच्या माध्यमातून 50 लाख पेक्षा जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असल्याचे जमात तर्फे सांगण्यात आले. या मोहिमेसाठी विशेष वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून समाजातील विविध अनिष्ट प्रथा, स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी अशा अनिष्ट प्रथा रोखण्याचा, जगाला प्रेम व शांतीचा संदेश देण्याचा, सर्व धर्मांच्या व्यक्तींचा जगण्याचा हक्क मान्य करणे, सामाजिक सौहार्द वाढवणे, महिला व बालकांची सुरक्षा करणे, जात-धर्म-वंश-रंग-लिंग यावरून कुणालाही वेगळी वागणूक न देणे असे विविध संदेश देण्यात येणार आहेत.

Related posts

कुर्ल्यातील ‘शकिना मंजिल’ जीर्ण इमारत कोसळली

News Desk

वृत्तनिविदेकच्या अंगावर नारळाचे झाड कोसळले.CCTV

News Desk

मुंबईतील तीन डान्स बारचे परवाने रद्द, पोलिस उपायु्क्त सचिन पाटील

News Desk