HW News Marathi
देश / विदेश

माल्ल्याच्या विधानाने जेटली अडचणीत, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली | भारतीय बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपये थकवून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याने आता एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. “परदेशात जाण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती. तसेच समेट घडवून आणण्यासाठी मी जेटलींसमोर प्रस्तावदेखील ठेवला होता”, असे विजय माल्ल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केले आहे. विजय माल्ल्याच्या या विधानानंतर विरोधकांकडून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

“विजय माल्ल्याचे विधान गंभीरतेने घेणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत,” असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जेटलींच्या राजीनाम्याचीदेखील मागणी केली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेता पीएल पुनिया यांनी अर्थमंत्री अरुण जेटली आणि विजय माल्या यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये चर्चा करताना पाहिले असल्याचा दावा केला आहे. तसेच माल्ल्या देश सोडून जाण्याचा दोन दिवस आधी या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचेही पीएल पुनिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विजय माल्याच्या विधानानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत स्पष्टीकरण देणारे एक पत्रक जारी केले आहे. त्यांची आणि विजय माल्ल्यांची भेट झाली होती मात्र ती अधिकृत नव्हती, असे अरुण जेटली यांनी त्यात पत्रकात स्पष्ट केले आहे. विजय माल्ल्याचे हे विधान संपूर्ण चुकीचे असून २०१४ पासून मी मल्ल्याला भेटायची वेळच दिलेली नाही, असेही जेटली यांनी स्पष्ट केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींनी देशासाठी स्थापन केल्या ‘या’ तीन महत्त्वाच्या समित्या

News Desk

तिहेरी तलाकवरून राज्यसभेत गदारोळ, कामकाज स्थगित

News Desk

welcome2019 : देशासह जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

News Desk