HW News Marathi
महाराष्ट्र

‘आम्हाला फक्त ब्रम्हज्ञान त्यांच्यासाठी कोरडे पाषाण’, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाली. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं. नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार की नाही याबाबत उत्सुकता होती. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता. मात्र राणेंनी आज नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

तर यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी सहभागी झाले होते तर यावेळी देवेंद्र फडणीस बोलताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जे मंत्रिमंडळ तयार केलं आणि या मंत्रीमंडळात एक प्रकारचं भौगोलिक प्रतिनिधित्व मिळाले, आणि आपण बहुजनांचं राज्य म्हणतो ते आज मोदींच्या नेतृत्वात मंत्रिमंडळात पहायला मिळते. ज्या मंत्रिमंडळात नरेंद्र मोदींनी निवडून निवडून लोकं घेतले त्यात आमच्या राणे साहेबांचे नाव आहे. लघु आणि सूक्ष्म साहेबांकडे असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि राणे साहेबांच्या नेतृत्वात छोट्यातील छोटा माणूस उद्योजक बनेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जन आशीर्वाद यात्रेत बोलताना स्पष्ट केले.

महाराष्ट्राची अधोगती होत चालली आहे

महाराष्ट्रात या सरकारच्या नेतृत्वात राज्याची कशी अधोगती होते हे पाहायला मिळते, महाराष्ट्रात ज्या प्रकारे सरकारी वसुली चालली आहे. आणि एक एक घटना समोर येते, म्हणून आता संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस या जन आशिर्वाद यात्रेत म्हणालेत.

म्हणून भारतीय जनता पार्टी आता संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, आमचं कुणाशीही शत्रुत्व नाही पण आम्ही जनतेचे बांधील आहोत, म्हणून जनतेला लुटण्याचे काम या महाराष्ट्रात होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही असेदेखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे आशीर्वाद घेण्याचं काम आणि जनतेच्या समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं पर्यंत पोहोचवण्याचं काम या जन आशीर्वाद यात्रेतून आम्ही करतोय.

मुख्यमंत्र्यांना फडणवीसांचे उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीची चिंता करत असताना, शिवसेनेलाही सांगितलं पाहिजे, राष्ट्रवादीलाही सांगितलं पाहिजे नाहीतर आम्हाला फक्त ब्रम्हज्ञान त्यांच्यासाठी कोरडे पाषाण असं मुख्यमंत्र्यांनी राहू नये अशी टीका देवेंद्र फडणीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

शिवसेनेला यात्रेची भीती वाटू लागली का?

ज्या प्रकारे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ला मुंबईत समर्थन मिळतंय, म्हणून आमचे जे कोणी विरोधक आहेत त्यांना धडकी भरणारच असे देखील उद्धव ठाकरे या यात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना म्हणाले. मित्रांचा डीएनए विरोधी पक्षातुन तयार झालाय. म्हणून आमच्याकडे पोलिसांचा बळाचा वापर करणं हे आमच्यासाठी नवीन नाही असं देखील सांगायला देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषेची चीड येते असे बोलणाऱ्या जान कुमार सानूवर मनसेचा हल्लाबोल!

News Desk

“आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस अन् गोड चहा घेणं सोडा” – सदाभाऊ खोत

News Desk

शरद पवारांच्या आवाहनाला एसटी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद

News Desk