HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंवर बोलताना नितेश राणेंची घसरली जीभ, नितेश म्हणाले,’शब्द मागे घेतो’!

मुंबई। शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र अर्थातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील वारंवार भाजपच्या नितेश राणेंकडून टार्गेट केलं जातं आता देखील तसाच काहीसा प्रकार पहायला मिळाला, भाजप आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. काल ( ६जुलै) ला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान पायऱ्यांवर भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत बोलताना आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर मुंबईत शिवसैनिकांनी यावर जोरदार राडा केल्यानंतर आता नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट देखील केल्याचं समोर आलंय.

अधिवेशनाच्या पहिल्याच (५जुलै) च्या दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या आमदारांना गदारोळ केल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या(६जुलै) ला कोणत्याही कामकाजात भाजप आमदारांनी सहभाग घेतला नाही. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसूनच भाजप आमदारांनी सरकारविरोधात आपला राग व्यक्त केला. यावेळी भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. आणि याच प्रति विधानसभेत बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

शिवसैनिक आक्रमक-

नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक जोरदार आक्रमक झाले. आज (७जुलै) सकाळी भारतमाता सिनेमासमोर नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट देखील पाहायला मिळाली. आमदार अजय चौधरी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी माफी मागावी आणि इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावं, असं प्रत्युत्तर नितेश राणेंना दिलं.

 

काय म्हणालेत नितेश राणे-

सरकारवर टीका करताना, सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना प्रतिविधानसभेत नितेश राणे जास्तच आक्रमक झाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचेच वंशज आहेत का यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे आक्षेपार्ह विधान नितेश राणे यांनी केलं होतं. यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक होत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागावी असा पवित्रा धरला होता त्यानंतर नितेश राणे यांनी असं म्हटलंय कि कालच्या भाषणात मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख घेतला होता. तू बऱ्याच जणांनी चुकीचा घेतला कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो असं ट्विट नितेश राणे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल-उद्धव ठाकरे ,अजित पवार भेटीत नेमकं काय घडलं ? १२ आमदारांबद्दल राज्यपाल काय म्हणाले ?

News Desk

मराठा आरक्षण | संभाजीराजे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार

News Desk

दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला

News Desk