HW News Marathi
देश / विदेश

अखेर मराठा आरक्षणाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून वातावरण पेटलेले असताना आता मराठा समाजासाठी एक चांगली बातमी आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा अर्ज स्वीकारत अखेर मराठा आरक्षणाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. विनोद पाटील यांनी आज (२८ ऑक्टोबर) सकाळी याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती विनोद

पाटील यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाज प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षण प्रश्नांच्या सुनावणीस राज्य सरकारचे वकील काही काळ उपस्थित न राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडे तहकूब केली होती. त्याचप्रमाणे, तुम्ही घटनापीठाकडेही जाऊ शकता असंही न्यायालयाने नमूद केलं होतं. न्यायालयाकडून सुनावणी तहकूब करण्यात आल्यानंतर हा निव्वळ राज्य सरकारचा हलगर्जीपणा असल्याचीही टीका विरोधकांकडून झाली.

राज्य सरकारचे वकील काही काळ अनुपस्थित असल्याने निर्माण झालेल्या या रोषाच्या पार्श्वभूमीवर विनोद पाटील यांनी “मराठा आरक्षण संदर्भात झालेल्या निर्णयाप्रमाणे तात्काळ ५ न्यायमूर्तींचे घटनापीठ गठित करण्यात यावे. या घटनापीठासमोरच मराठा आरक्षण स्थगिती उठवण्याकरिता दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्यात यावी”, असा अर्ज दाखल दाखल केला होता. दरम्यान, यापूर्वी राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी खंडपीठ स्थापन करण्याची मागणी करणारा अर्ज सरन्यायाधीशांकडे दाखल करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तरप्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला

News Desk

६ डिसेंबरला बाबरी मशीद जादूने पाडण्यात आली होती का? ओवीसींची संतप्त प्रतिक्रिया

News Desk

एकजुटीने कोरोनारूपी रावणाचा नाश करूया ! विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

News Desk