HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर गडावरून सुखरुप सुटका

मुंबई | हरिश्चंद्रगड येथील कोकणकड्याच्या पायथ्याला अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या मदतीने या ट्रेकर्संना वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. असे असले तरी ट्रेकर्संना बेस कॅम्पपर्यंत पोहचण्यासाठी आणखी काही तासांचा कालावधी लागणार आहे. सूर्योदय झाल्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत ‘न्याहारी’चे खाद्यपदार्थ, पाणी, ग्लुकोज, चहा, बिस्किटे पोहोचविली. त्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षित ट्रेकर्स च्या मदतीने गड उतरण्यास सुरुवात केली आहे.

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिशचंद्रगड येथे ट्रेकिंसाठी गेले होते. यामध्ये ५ महिला आणि त्या ठिकाणाहून दिड किलोमीटर पुढे १०० फूट खाली हे सर्व ट्रेकर्स अडकले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीस यांना देखील यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका करण्याबाबत निर्देश दिले होते. ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची यासाठी मदत घेतली जात आहे. या ट्रेकर्संना काळोख्या गडावर रात्र काढावी लागली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला करमणुकीची गुढी उभारली | राम कदम

News Desk

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

News Desk

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?, राष्ट्रवादीचा सवाल

News Desk