HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेची कोंडी करत राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन

मुंबई। राज्यात शिवसेनेला मोठा धक्का देत आज (२३ नोव्हेंबर) राष्ट्रवादी-भाजपने सरकार स्थापन केले आहे.

राजभवनात सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. एकीकडे गेले अनेक दिवस शिवसेनेसोबत महाविकासआघाडीची चर्चा करणाऱ्या राष्ट्रवादीने घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“महाविकासआघाडीची चर्चा लांबत गेल्याने, अनेक अवास्तव अपेक्षा वाढल्याने राज्याला एक स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर माध्यमांना दिली.तर “जनतेचा कौल डावलून शिवसेनेने लोकांचा अपमान केला. शिवसेनेमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली”, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने महाविकासआघाडीच्या दृष्टीने राज्यात तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठका सुरू होत्या. इतकेच नव्हे तर “राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत” झाल्याची माहिती कालच (२२ नोव्हेंबर) शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना दिली होती. या पार्श्वभूमीवर आजची ही राजकीय घटना शिवसेनेसाठी जबर धक्का मानली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र पर्यटनाचे मोठे पाऊल!, ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

Manasi Devkar

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवून संपूर्ण देश एक केला !

News Desk

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही – शरद पवार

News Desk