HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी !

मुंबई | मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. “पुढील ५ वर्षेही मीच मुख्यमंत्री राहणार”, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केले होते. यानंतरर ५०-५०चा फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरला होता, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत काल (२९ ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. फडणवीस आणि राऊत या दोघांच्या वादात आता अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. मुनगंटीवार म्हणतात “आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याची शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे,” असे वक्तव्य केले.

मुनगंटीवारांनी म्हटले की, ” शिवसेनेला जसे सर्व पर्याय खुले आहेत, तसेच भाजपलाही पर्याय खुले आहेत. पण ‘रघुकुलरीत सदा चली आई’ या म्हणीनुसार जर आपण महायुती केली आहे. तर महायुतीच्या सोबतच राहिलं पाहिजे, असा सल्ला मुनगंटीवार यांनी शिवसेनेला दिला. जसे अनेक हात शिवसेनेकडे येत आहेत. तसेच अनेक लोक भाजपला समर्थन करण्यासाठी पुढे येत आहेत. प्रश्न कुणाला किती समर्थन आहे हा नाही, तर प्रश्न हा जनतेने महायुतीच्या मागे मत रुपी आशीर्वाद उभा केला. मग जर महायुतीला जनतेचा मतरूपी आशीर्वाद मिळाला असेल तर दुसऱ्यासोबत जाण्याचा पर्याय खुला आहे, असे म्हणणे ही एक राजकीय मोठी घोडचूक होऊ शकते, ” अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना मुख्यमंत्री पदावरून आक्रमक

यानंतर राऊत यांनी काल (२९ ऑक्टोबर) ५०-५० फॉर्म्युला हा लोकसभेवेळीच ठरला असल्याचा दावा, राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद हा शिवसेनेचा हक्क, असे म्हणत त्यांनी भाजपला धमकी वजा इशारा दिला आहे. फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर कधीही चर्चा झाली नाही, असे जर मुख्यमंत्री बोलत असतील तर आपल्याला सत्याची व्याख्याच बदलावी लागेल, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी?, राज्यातील नेते जाणार सोनिया गांधींच्या दरबारी

Aprna

राणा दाम्पत्यासह १४ कार्यकर्त्यांवर रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावल्यामुळे गुन्हा दाखल

Aprna

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे!

News Desk