HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून ११ नुकसानग्रस्तांना चेक वाटप

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (१९ ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. तसेच, शेतकऱ्यांना राज्य सरकार सर्व मदत करेल असे आश्वासन देखईल दिले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. ११ नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आज सकाळी ८ वाजता मातोश्री निवासस्थानावरुन सोलापूरसाठी रवाना झाले. मुंबईवरुन त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि महसूलमंत्री थोरात हे विमानाने सोलापूरला पोहोचले आहेत. माझ्या ७० वर्षांच्या आयुष्यात एवढा पाऊस पाहिला नव्हता, अशा शब्दात शिवशंकर कोंणगे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर यांच्यासमोर व्यथा मांडली आहे. तुमच्या आशीर्वादांच्या जोरावरच या संकटातून बाहेर पडू, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कोणगेंना धीर दिला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री दौऱ्यावर निघाले आहेत. सोलापुरातील रामपूर गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

“आमच्या सरकारची सुरुवात झाल्यापासून न भूतो न भविष्यती संकटं येत आहेत. कोरोनाचं संकट आलं आता अतिवृष्टीचं संकट आहे. संकटाचे डोंगर उभे राहत आहेत. शेतकऱ्यांचे आमच्यावर आशीर्वाद आहेत. या आशीर्वादांच्या जोरावरच आम्ही या संकटातून बाहेर पडू” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. सोलापूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी ११ जणांना चेक देऊन दिलासा देण्यात आला आहे.

दरम्यान, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सध्या, नेमकी किती मदत करायची याची माहिती मी गोळा करत आहे. ही माहिती उपलब्ध झाली की शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल. शेतकऱ्यांना नाराज करणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ईडी’चा यू टर्न, शरद पवारांनी तूर्तास चौकशीला येण्याची गरज नाही

News Desk

गृहनिर्माण मंत्र्यांचा खुलासा समाधानकारक नाही! : राधाकृष्ण विखे पाटील

News Desk

बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार! – धनंजय मुंडे

News Desk