HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात आग

पुणे: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या आंबा मोहत्सवात गुरुवारी अचानक आग लागली. हा आंबा महोत्सव पुण्यातील मार्केटयार्डमध्ये आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात लावलेले आंब्याचे सर्व स्टॉल्स जळून खाक झाले आहेत.

गुरुवारी सकळी ११ च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत महोत्सवातील स्टॉल्स जळून खाक झाले आहेत. यावेळी महोत्सवात जवळपास ६६ स्टॉल्स लावण्यात आले होते. महोत्सवात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या लाकडी पेट्या आणि टोपल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.

या महोत्सवात लावण्यात आलेले आंबे जळून खाक झाल्यामुळे महोत्सवात सहभागी झालेल्या शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दोन ते अडीच तास प्रयत्न केल्यानंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अद्याप या आगीचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेमुळे आंबा महोत्सवाला भेट देणा-या पुणे करांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे मंत्री फक्त पेन आणि फाईल उचलतात…

Arati More

ड्रग्स रॅकेट उघड करणे हा माझा गुन्हा ठरला – कंगना राणावत

News Desk

संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेने ठेवले दुधात

News Desk