HW News Marathi
महाराष्ट्र

बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन

बीड । गेल्या काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा नावाच्या महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर तिने बलात्काराची केस मागे घेतली होती. तरीही समाज माध्यमांतून धनंजय मुंडेंविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर धनंजय मुंडेंनी या सर्व प्रकरणावर मौन सोडले आहे. आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी या सर्व प्रकरणावर खुलासा केला आहे.

“एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.अशा कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी माझ्या पाठीशी साथ उभी केली. मी शब्दात आभार मानू शकत नाही. आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याची जोडे करून जरी आपल्याला घातली तरीही ती फिटू शकत नाही”, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे माध्यमांशी संवाद साधताना यावेळी बोलत होते.

“आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो. जीवनामध्ये मी कोणाचेही मन दुखवून स्थान निर्माण केले नाही. मन जिंकून मी स्थान निर्माण केले आहे”, असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोदावरी पाणी प्रश्नाबाबत आमदारांचा बेफिकीरपणा

Gauri Tilekar

घोषणाबाजी न करता केलेल्या विकासकामाचे केले लोकार्पण; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Aprna

‘आप’च्या नौटंकीला मी काडीची किंमत देत नाही! – प्रविण दरेकर

Aprna