HW News Marathi
देश / विदेश

इस बात पर त्यागपत्र… राजीनामा तो बनता है साहेब, संजय राऊतांचा शेतकरी आंदोलनावरुन मोदींवर निशाणा

मुंबई | दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, आज सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलक शेतकरीदिल्लीतील लाल किल्ल्यावर धडकले आहेत. तर अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला दोषी ठरवले आहे. सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का. सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही. ही कुठल्या प्रकारची लोकशाही आमच्या देशात वाढत आहे. ही लोकशाही म्हणता येत नाही. काही औरच चालले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. इतकचं काही तर, दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे”.

“सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या.कोणाचा राजीनामा मागणार ? सोनीया गांधी,ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे,शरद पवार की ज्यो बाईडनचा? इस बात पर त्यागपत्र… राजीनामा तो बनता है साहेब”, असं म्हणत मोदींना टोमणा मारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा चित्ररथ सादर होणार

News Desk

भाजपला पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील तीन जागा मिळवण्यात यश

News Desk

‘उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत काय घडलं?’ संजय राऊत म्हणाले….

News Desk