HW News Marathi
देश / विदेश

#AyodhyaJudgement : सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत जमावबंदी लागू

मुंबई | अयोध्येमधील बहुचर्चित वादग्रस्त जागेवर आज अखेर पडदा पडला आहे. “अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच,” असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालायने आज (९ नोव्हेंबर) दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमध्ये कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. यानुसार आज सकाळी ११ वाजल्यापासून ते उद्या (१० नोव्हेंबर) ११ वाजेपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू करण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून लागू करण्यात आली आहे.

कलम १४४ अन्वये लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार एका ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईत सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने शहरात शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच निकालानंतर सोशल मिडीयावर आफावा पसरविणाऱ्यावर पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर ठेवली आहे. कुणीही अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ICSE आणि ISC परिक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार!

Jui Jadhav

मोदी-पवार भेटीबाबत अफवा पसरवण्याचं काम, राष्ट्रवादीचा आरोप

News Desk

सगल तीन दिवस बँका रहाणार बंद

News Desk