HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिला प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा

मुंबई | काँग्रेसचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून स्थानिक उमेदवारी दिलेली नसून उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर अवळला आहे. या पार्श्वभूमीवर आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेश महासचिवपदाचा आज (३१ मे) राजीनामा दिला आहे. परंतु, काँग्रेस पक्षात राहूनच काम करत राहणार असे ही त्यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

 काँग्रेसने राज्यसभेच्या उमेवारीवरून अनेक नेत्यांना नाराजी व्यक्त केली आहे. यापैकी आशिष देखमुख हे एक आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीत देशमुखांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. देशमुखांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. परंतु, देशमुखांना राज्यसभेत पाठवण्याचे आश्वास देण्यात होते, असा दावा देशमुखांनी केला होता. देशमुख म्हणाले, मी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. महाराष्ट्रात अतिशय कर्तबगार आणि काँग्रेसला चांगले नेतृत्व देऊ शकतात, असे नेते उपलब्ध आहेत. तरी देखील काँग्रेसने उत्तर प्रदेशाच्या इम्रान प्रतापगढी या व्यक्तीला महाराष्ट्रात लादण्यात आले. या निर्णयाचा मी निषेध करत असून काँग्रेसच्या महासचिव पदाचा राजीनामा देत आहे. मी राजीनामा देली असला तरी काँग्रेसमध्ये राहणार आहे. काँग्रेच्या माध्यमातून जनतेची सेवाक करणार आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे. 

“इम्रान प्रतापगडी हे फक्त कव्वाली, शायर आणि मुशायरे करतात. प्रतापगडी यांनी शिर्डीमध्ये होणाऱ्या नव संकल्प शिबिरातील कव्वालीचा कार्यक्रम ठेवला, असा देशमुखांनी त्यांचा उल्लेख केला. तसेच काँग्रेसच्या नेत्यांना कव्वाली, शायरी आणि मुशायरी करणे शिकवण्यात आले पाहिजे. यासाठी इम्रान प्रतापगडीना महाराष्ट्रातून आले, ” असे देशमुख म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे! – नितीन गडकरी

Aprna

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या मुलाला ED कडून समन्स

Aprna

‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आक्रमक!’

News Desk