HW News Marathi
महाराष्ट्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयीनं २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. देशमुखांची आज (१५ नोव्हेंबर) यांच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. देशमुखांची कोठडीची मुदत संपल्यामुळे पुन्हा त्यांना न्यायलयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने देशमुख यांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुखांना २ नोव्हेंबरला अटक करण्यात आले होते. तर मुंबई उच्च न्यायालयात ७ नोव्हेंबर रोजी ईडीच्या कोठडीत पाठविण्यात आले होते.

न्यायालयात सुनावणी दरम्यान, देशमुखांनी घरच्या जेवणाची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने देशमुखांची मागणी फेटाळून लावली. आधी तरूंगाचं जेवण खा, असे न्यायालयानं सांगितलं. ते जर तुम्हाला योग्य नसल्यास मग विचार करू, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

मुंबईमधील बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून दर महिन्याला १०० कोटी रुपयं वसूल करण्यात यावे, अशा आदेश देशमुखांनी दिला होता. या वसुलीची जबाबदारी देशमुखांनी सचिन वाझेंवर सोपवली होती, असा आरोप मुंबईचं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला होता. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आणि या प्रकरणाची दखल सीबीआय आणि ईडी घेऊन देशमुखांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यानंतर ईडीनं देशमुखांना ५ वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर न राहिल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर मार्ग अवलंबण्यात आला. दरम्यान, देशमुख हे त्यावेळी अज्ञातवासात गेले होतं, यानंतर काही दिवसांपूर्वी देशमुख मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कसबा विजयानंतर काँग्रेस राज्य आणि देश जिंकू; परंतु…”, मुख्यमंत्र्यांची सभागृहातून टीका

Aprna

बीड जिल्ह्यातील १०७८ गावांमधील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा! – गुलाबराव पाटील

Aprna

गृह विभागाच्या कामकाजावर मुख्यमंत्री नाराज; गृहमंत्री आणि शरद पवारांची बैठक

Aprna