HW News Marathi
महाराष्ट्र

“अमरावती हिंसाचार षडयंत्राचा भाग होता का ?,” मलिकांचा भाजपवर आरोप

मुंबई | अमरावती हिंसाचार प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपविरोधात खळबळजनक खुलासे केले आहेत. “भाजप नेते आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात का गेले ?. याठिकाणी शेलारांची अकादमीच्या नेत्यांसबोत मिटिंग झाली असून हा सर्व षडयंत्राचा भाग होता का ?, असा आरोप मलिकांनी आज (१५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून केला आहे. यावेळी शेलारांनी पत्रकार परिषदेत शेलारांचा एक फोटो दाखविला असून या फोटोत रझा अकादमीच्या नेत्यासोबत एकत्र बसून बैठक करत असल्याचे दिसत आहे, असा आरोप मलिकांनी केला आहे.

भाजपने अमरावतीत बंदच्या आडून दंगल घडवण्याचे काम केले. परंतु पोलिसांनी भाजपचा हा कट उधळून लावला. तसेच राज्यात दंगल घडवण्याचे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप मलिकांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडें यांना आज सकाळी अटक करण्यात आली. मात्र, सायंकाळी बोंडेंना जामीन देखील मंजूर झाला आहे. पोलिसांनी बोंडेंविरोधात दंगल भडकवण्या वर्तन केल्याच्या कलमा अतंर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदविला होता.

अमरावत हिंसाचार भडकविण्यासाठी मुंबईतून पैसे – मलिक

अमरावतीमध्ये हिंसाचार भडकविण्यासाठी मुंबईतून पैसे आणि दारू पाठवण्यात आली होती, असा खुलासाही मलिकांनी केला आहे. भाजप राज्यात हिंसाचार घडवून राजकारण करत आहे. अमरावती वगळता राज्यातील इतर कुठेच काही घडले नाही. अमरावतीत शहरात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणाच सर्व तपास पोलीस करतील आणि आरोपीवर योग्यती कारवाई देखील होईल, असेही मलिकांनी म्हटलं.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा…

News Desk

सुहास कांदे-छगन भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासनाला पाठवली कागदपत्रे

News Desk

“या परीक्षेत आम्ही चांगल्या प्रकारे पास होऊ”, पदवीधर निवडणूकीवरुन फडणवीसांची प्रतिक्रिया 

News Desk