HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर परमबीर सिंह मुंबईत दाखल!; म्हणाले, “मी…”

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज (२५ नोव्हेंबर) अखेर माध्यमांसमोर आले आहेत. परमबीर सिंह हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर सिंहांवर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला किंवा कुणाला तरी दिल्याचा आरोप निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी केला आहे.

“मी चंदिगढमध्ये होतो”, असं परमबीर सिंह यांनी इंडिया टुडेला प्रतिक्रिया देताना सांगितले. परमबीर सिंहांना काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून फरार घोषित करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी न्यायालयाला प्रतिज्ञापत्र देत आपण भारतातच असल्याचं सांगितलं होत. स्वतः परमबीर सिंह यांच्या वकिलांनी याबाबत न्यायालयाला माहिती दिली होती. महाराष्ट्र पोलिसांकडून आपल्या जीवाला धोका असल्याने परमबीर सिंह समोर येत नाहीत. पुढील ४८ तासात कोणत्याही सीबीआय किंवा इतर कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद वकिलांनी काही दिवसांपूर्वी केला होता आणि आता अखेर ते मुंबईत दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्याय करणाऱ्यांच्या  नरडीचा घोट घेणारा मी पँथर – आठवले

News Desk

देगलूरमध्ये जितेश अंतापूरकरांना सहानुभूतीची फायदा झाला! – रामदास आठवले

News Desk

“कोण किती जातीवादी, एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या,” धनंजय मुंडेंचे राज ठाकरेंना आव्हान

Aprna