HW News Marathi
महाराष्ट्र

 #CoronaVirus : आजपासून सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध लागू

मुंबई। देशात कोरोना व्हायरसच्या विळख्यात जाता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जनतेला गर्दी टाळण्याचे वेळोवेळी आवाहन गेले. मात्र, तरीही मुंबईच्या लोकलमधील गर्दी ओसरताना दिसत नाही. कारण कोरोनाचा संसर्ग लोकल ट्रेनमध्ये होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. आता लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरात आज जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून (२२ मार्च) ते ३१ मार्चपर्यंत लोकल ट्रेन प्रवासावर निर्बंध लावण्यात आला आहे.

या निर्बंधानुसार, लोकलमधून आता सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. याबाबतची विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. मुंबईच्या लोकल ट्रेन मधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने हे कठोर पाऊल उचलण्याचे बोले जात आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्र जास्त आहे. यामुळे खबदारीचा उपाय म्हणून राज्या सरकारने यापूर्वी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आली आहे. याबंददरम्यान या चारही शहरातील अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत. इतर कार्यलये आणि कंपन्या बंद करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वांद्रे प्रकरणी उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबेला अटक

News Desk

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे!

News Desk

एसटी कर्माचाऱ्यांची अवस्था मिल कामगारांप्रमाणे करण्याचा डाव; पडळकरांचा सरकारवर आरोप

News Desk