HW News Marathi
महाराष्ट्र

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी!

मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाची गेले दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज त्याला निरोप देण्याची घडी आली आहे. सकाळीपासूनच मुंबई पुण्यातील गणरायांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा गजर आसमंतात दुमदुमून राहिला आहे.

मुंबईतील गणेश गल्लीचा गणपतीही दरवर्षीप्रमाणे यंदा सर्वांत आधी विसर्जनासाठी निघाला आहे. मुंबईतील तब्बल १९९ ठिकाणी गणपतींचे विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व पोलिसांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्यातही गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केले आहे. यासाठी शहरातील प्रमुख १७रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार करण्यात आला असून वाहनचालकांनी त्याचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुका आता सुरूच होत आहेत. दगडूशेठ हलवाईची मिरवणूक संध्याकाळनंतर सुरू होईल. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांसह १२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. ७ हजार ५०० पोलीस तैनात असणार आहेत. यात महिला आणि वाहतूक पोलिसांची विशेष पथकेही असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

Aprna

‘पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही’, चंद्रकांत पाटलांचा पंकजा मुंडेंवर विश्वास

News Desk

लढाऊ विमान उडवणारी पहिली भारयीत महिला

News Desk