HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई । राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (18 डिसेंबर) मतदान  सुरू झाले आहे. या निवडणुकीचे निकाल 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी आज सकाळी  7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.

मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात आली आहे. या नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत दिली होती. आणि दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप झाले होते.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये जास्त पोलीस तैनात केले आहेत.

 

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या : 

अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदूर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला, राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

News Desk

उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये !

News Desk

“महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केली”, बावनकुळेंचा आरोप

News Desk