HW News Marathi
महाराष्ट्र

‘बंगालमध्ये मी तीन आमदार निवडुन आणले’ भाजपच्या गिरीश महाजनांचा दावा !

मुंबई | देशात सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत २०० पार होत सत्ता स्थापन करण्याचं भाजपचं स्वप्न भंगले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा संपु्र्ण दबदबा पाहायला मिळाला. २०० पेक्षा जास्त जागा घेत ममतांनी मोदी शहांना पराभवाची धूळ चारली आहे.मात्र दुसरीकडे भाजपच्या गेल्या विधानसभेच्या तुलनेत बंगालमध्ये जागा वाढल्या आहेत,त्याचं समाधान सध्या भाजप नेत्यांना आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता एक दावा केला आहे. महाजन यांच्यावर भाजपने पश्चिम बंगालच्या काही मतदारसंघांची जबाबदारी सोपवली होती. त्त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या भागातील तीनही मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, असे महाजनांनी जाहीर केले आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले ?

भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर भाजपने पश्चिम बंगालमध्ये उमेदवारांच्या प्रचाराची जबादारी दिली होती.एकीकडे बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळाली नसली तरी आपण ३ आमदार कसे निवडुन आणले हे गिरीश महाजनांनी सांगितले आहे.त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहीलं आहे की ,

माझ्याकडे जवाबदारी असलेल्या 3 मतदारसंघातील

बालूरघाट – श्री. अशोकजी लहरी

गंगारामपूर – श्री. सत्येंद्रनाथजी राय

तपण – श्री. बुधुरायजी तुडू

हे उमेदवार विजयी झाले आहेत…

कित्येक कार्यकर्त्यांनी रक्त सांडले, बलिदान दिले परंतु भाजपाचा राष्ट्रवादी विचार सोडला नाही…या संघर्षाच्या आणि मेहनतीच्या जोरावरच आम्ही ताकदीने लढलो आणि 3 वरून 75 वर पोचलो.पश्चिम बंगाल मधील भाजपाच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन !

बढने दो हमें,

रोको मत हमें,

अभी तो शुरुआत हैं,

बहूत उंचा उडना हैं हमें…

अशा आशयाची फेसबुक पोस्ट त्यांनी लिहीली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बालभारतीच्या ८ वीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याऐवजी कुरबान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख 

News Desk

‘पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर देणारा मीच होतो’, गुलाबराव पाटलांचं विधान

News Desk

मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Aprna