HW News Marathi
महाराष्ट्र

अयोध्येचे निमंत्रण आले असते तरी मुख्यमंत्री गेले असते का? कारण सध्या त्यांची फजिती झाली आहे – गिरीष महाजन

नाशिक | आज (५ ऑगस्ट) अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. यावरूनच माजी मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. “बरे झाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण आले नाही. कारण आमंत्रण आले असते, तरी ते गेले असते, की नाही याविषयी शंकाच आहे. कारण सध्या त्यांची फजीतीच झालेली आहे”, असा टोमणा त्यांनी लगावला. अयोध्येतील भूमिपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर आज महाजन यांनी भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

“सध्या कोरोना आहे, याची सगळ्यांना जाणीव आहे. मात्र सर्व खबरदारी घेऊन भाविकांना परवानगी दिली पाहिजे. नाशिक हे श्रीरामांचे वास्तव्य असलेले शहर आहे. येथे कार्यकर्ते संस्थांना धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यायला हवी होती. परंतु आज शहरातील सर्व मंदिरे बंद आहेत. धार्मिक संस्था बंद आहेत. हे अतिशय अयोग्य आहे. ही सर्व मंदीरे खुली असायला हवी होती. मात्र प्रशासनाने नागरिकांची अडवणूक केली आहे”.

“अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये, यासाठी त्यांच्या सहकारी पक्षांनी विधाने करण्यास सुरवात केली होती. काँग्रेसने मुख्यमंत्री ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी भूमिका घेतली होती. दुसरा सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसने डोळे वटारून मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला अजिबात जाताच कामा नये, असे म्हटले. त्यात मुख्यमंत्र्यांचा गोंधळ झाला”.

“दोन्ही पक्षांना सांभाळायचे असल्याने त्यांची चांगलीच फजीती झाली आहे. त्यामुळे बरे झाले, त्यांना निमंत्रण आले नाही. कारण निमंत्रण आले असते, तरी ते गेले असते का? याविषयी मला शंकाच आहे. त्यामुळे निमंत्रण आले नाही, त्यामुळे एक प्रकारे हे चांगलेच झाले” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध चांगलीच टोलेबाजी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विनायक पाटील यांच्या निधनामुळे बहुआयामी नेतृत्व हरपले | बाळासाहेब थोरात

News Desk

…शपथ देऊनही कार्यकर्ते थांबतील का ?, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला

News Desk

देशातील जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणाऱ्या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा!

News Desk