HW News Marathi
महाराष्ट्र

सोन्याने गाठला उच्चांक, ५० हजारावर मारली उसंडी

मुंबई | कोरोनाच्या या कठीण काळात अनेक बाबी बदलल्या. काही जणांची ठरलेली लग्ने पुढे ढकलली गेली तर काहींनी तोंडाला मास्क लावत लग्नाची गाठ बांधली. लग्न सराई म्हटलं की दाग दागिने, कपडे सर्वच बाबी येतात. मात्र, लग्न म्हणजे सोन्याची खरेदी अतिशय महत्त्वाची असते.

मात्र, याच लग्न सराईच्या ऐन हंगामात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. मुंबईत प्रतितोळा सोन्यासाठी नागरिकांना तब्बल ५०,२८२ रुपये खर्च करावे लागणार आहे. यासाठी जीएसटीच १५०० रुपयांच्या आसपास भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना १० ग्राम सोन्यासाठी जीएसटी सहित ५१,७८२ रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या दरांत आणखी वाढ होऊन ते दसऱ्यापर्यंत ५५ ते ५६ हजारांच्या आसपास जाऊ शकते अशी शक्यता देखील मुंबई ज्वेलर्स असोसिएशनकडून वर्तवण्यात आले आहे.

सोमवारी २९ जूनला जीएसटी सोडून सोन्याचा १० ग्रामसाठी दर ४८,८८६ इतका होता. यामध्ये आज (२ जुलै) जवळपास १४०० रुपयांची वाढ होऊन तो ५०,२८२ इतका झाला आहे. एकूण विचार केला तर आज सोन्याच्या दरात १० ग्रामसाठी १४०० रुपयांची वाढ झाली आहे. यासोबतच जुलै महिन्याच्या

दिवशी चांदी देखील 50 हजारांच्या पूढे गेली आहे. आणि आज दुसऱ्याचं दिवशी सोने देखील 50 हजारांच्या पुढे गेले आहे.

याबाबत बोलताना मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन म्हणाले की ही वाढ होणं अपेक्षित होतं. यामध्ये दसऱ्यापर्यंत आणखी वाढ होईल त्यावेळी सोन्याचे दर प्रतितोळा 55 ते 56 हजारांच्या आसपास असू शकतील. सध्या सोन्याचा अंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता सोनं 1700 ते 1800 डॉलरला पार करून पूढे गेले आहे. लॉकडाऊनच्या आधी सोनं 1250 च्या आसपास होतं. परंतू आता लॉकडाऊनचा परिणाम सोन्यावर जाणवू लागला आहे. भारतीय बाजाराचा विचार करता सोनं 38 हजार ते 40 हजाराच्या आसपास होते. परंतु आजअखेर त्यात 10 हजार रुपयांपर्यंत वध झाली आहे.

आगामी वर्षातही सोन्याची ही झळाळी कायम राहून २०२१ पर्यंत सोने ८२ हजारांवर जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केला आहे. हा अंदाज बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज्नी व्यक्त केलेला आहे. अमेरिकन स्पॉट बाजारात त्यांना सोन्याचं लक्ष्य ३ हजार डॉलर (1 औंसासाठी) इतके निर्धारित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कशाला आशीर्वाद?, जनतेचा जीव धोक्यात घालायला” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका!

News Desk

टिव्हीच्या नेटवर्क मध्ये राहणाऱ्यांना जनतेचे नेटवर्क काय कळणार? अजितदादा भाजपवर भडकले

News Desk

पर्यटनस्थळांची स्वच्छता ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी : पर्यटन मंत्री जयकुमार रावल

News Desk