HW News Marathi
महाराष्ट्र

ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर, स्वगृही परतण्याचा मार्ग खुला !

बीड | राज्यातील ऊसतोड कामगारांचा प्रश्न आता अखेर मार्गी लागला असून स्वतः राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. “माझ्या ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर! तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा”, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अन्यत्र अडकून पडलेल्या या कामगारांचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ऊसतोड मजुरांना आवश्यक तपासण्या करून त्यांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबाबतचा शासन निर्णयाचे जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा महसूल विभागाच्या मार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बीड, अहमदनगर यांसह विविध जिल्ह्यातील ऊसतोड मजूर जे पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भाग यासह राज्यातील विविध भागात अडकलेले आहेत त्यांना आता स्वगृही परत जाता येणार आहे. धनंजय मुडेंनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या मागील मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांनी याबाबत व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी होत मागणी केली होती.

राज्यातील ३८ साखर कारखान्याकडे सुमारे १,३१,००० ऊसतोड कामगार तात्पुरत्या निवारा गृहात आहेत, तर अन्य काही ऊसतोड मजूर कारखाने बंद झाल्यामुळे गावी परतत असताना संचारबंदी मुळे रस्त्यात अडकून पडले आहेत. अनेक जण आपल्या कुटुंबियांपासून दूर असून त्यांच्या व त्यांच्याकडे असणाऱ्या जनावाऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटेंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  

News Desk

भाजपच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन शिवसेना पोट भरतेय!

News Desk

माजी सैनिकांना घरपट्टी कर भरावा लागणार नाही, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk