HW News Marathi
देश / विदेश

अजित पवार टग्याचा आव आणतायत, पडळकरांची अजित पवारांवर गंभीर टीका

मुंबई | भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांसारख्या नेत्यांनी केला आहे. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठीच ते अशाप्रकारचे दावे करत सुटल्याची टीका पडळकर यांनी केली आहे.

“अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु आहे,” असा खोचक टोला पडळकरांनी लगावला आहे.

भाजपला सत्ता ही लोककलण्यासाटी हवी असते. तर महाविकास आघाडीतील नेत्यांना सत्ता ही स्वत:च्या कल्याणासाठी हवी असते, अशी टीकाही त्यांनी केलीय. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील कोणताही नेता सांगत असला तरी भाजपचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा पडळकर यांनी केलाय. त्याचबरोबर तुरुंगातील सतरंजीवर झोपण्यापेक्षा तुम्हाला विश्वासघातानं राजगादी मिळाली आहे. ती गादी सांभाळा आणि लोककल्याणासाठी सत्तेचा वापर करा, असा सल्लाही पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाची ८ मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार

News Desk

CTET परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार

Aprna

हे तर केंद्रसरकारने जनतेला दिलेले रिटर्न गिफ्ट – जयंत पाटील

News Desk