HW News Marathi
महाराष्ट्र

४ खासदार निवडून येतात त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदर निवडून देणाऱ्या मोदींना काय म्हणायचं? पडळकरांचा सवाल

सांगली | राजकीय वर्तृळात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सुर आहे. अशात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केला आहे. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असे म्हणत त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात पडळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदर निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे. पदवीधरची निवडणूक ही भ्रष्टाचाराविरोधातील आणि प्रखर जातीयवाद्यांच्या विरोधातील आहे. या टग्यांच्या सरकारच्या विरोधातील ही निवडणूक आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा

Aprna

“चुना लगाव आयोग… “, उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

Aprna

महाविकासआघाडीचे संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

News Desk