HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ती प्रेस गांजा ओढून घेतली होती का?”, लसीकरणावरुन गोपीचंद पडळकरांचा सवाल

सांगली | देशात १ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्या नागरीकांना कोरोना लस देण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. महाराष्ट्रात देखील लसीकरण सुरू होणार आहे. तसेच, हे लसीकरण मोफत असणार अशी घोषणा देखील राज्य सरकारने केली आहे. या सगळ्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ मेपासून सगळ्यांना लस देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?

“काल सकाळी राज्याच्या पालकमंत्र्यांनी घोषित केलं की १ तारखेपासून आम्ही १८ वर्षांवरील सगळ्यांचे आम्ही लसीकरण करणार आहोत. नंतर ४ वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ? यांना उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. यांना केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. मुळात विचारसरणी एक नसताना, कोणताही अजेंडा नसताना ते एकत्र आले आहेत,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

भाजपला विरोध करण्यासाठी हे एकत्र आले

पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांवर सडकून टीका केली आहे. भाजपचं राजकीय प्रस्थ समाप्त करण्यासाठी हे पक्ष एकत्र आल्याचा आरोप पडळकर यांनी केला. “कोणतीही विचारधारा तसेच अजेंडा नसताना हे तिन्हा पक्ष एकत्र आले आहेत. भारतीय जनता पार्टीची जिरवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. मात्र, भाजपचं काम चांगलं असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही. यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचं जिरवण्याचं काम मात्र या सरकारने केलं आहे,” असा टोला पडळकर यांनी गलावला. तसेच पुढे बोलताना त्यांनी राज्य सरकारने या सर्वांमधून बाहेर येऊन महाराष्ट्रात कोणाचीही मृत्यू होऊ नये त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

राजेश टोपे काय म्हणाले होते?

राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाही. त्यामुळे १ मे पासून राज्यात १८ वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी २८ एप्रिल रोजी स्पष्ट केलं.काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात १ मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : राज्यातील ‘ही’ चार शहरे येत्या ३१ मार्चपर्यंत बंद राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

swarit

#CoronaVirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३६ वर

swarit

“कोरोना ही बिल गेट्सची कल्पना” बंडातात्या कराडकरांचे अजब वक्तव्य

News Desk