HW News Marathi
महाराष्ट्र

‘संजय राऊतांचं असंय, खातात शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’ – गोपीचंद पडळकर

सांगली | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर कायम ठाकरे सरकारवर टीका करत असतात. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहे. अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला, असेही पडळकर यांनी म्हटले आहे. ते आज (२७ जून) सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, आजच संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते. माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला चार महिन्यांत आरक्षण मिळवून देईन, असे फडणवीस म्हणतात. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केलं होतं. ते मला चांगलं आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावलाय.

शरद पवार ठाकरे सरकारबद्दल काय म्हणतात?

महाविकास आघाडी सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. सरकार पाच वर्ष टिकेल याबद्दल शंका नाही” असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आम्हा सर्व पक्षांमध्ये सामंजस्य आहे, यात कुठलेही मतभेद नाहीत, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. ते बारामतीमध्ये बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड असल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीये, रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला

News Desk

माजी मुख्यमंत्र्यांचा आजी मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनबद्दल दिला ‘हा’ सल्ला

News Desk

‘उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यपाल 12 आमदारांची नियुक्ती करतील’, नवाब मलिकांची टीका!

News Desk