HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या मदतीला सरकारी ठेंगा ,भाजप कार्यकर्त्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन


मुंबई। अतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे नुकसान सोसावे लागणार्‍या शेतकर्‍यांना आघाडी सरकारने अल्प मदत केली आहे. ह ा शेतकर्‍यांचा अवमान आहे. याविरोधात येत्या 1 नोव्हेंबर सोमवारी भाजपच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध केला जाणार असल्याची घोषणा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. पक्षाचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून हे आंदोलन केले जाणार आहे.

शेतकर्‍यांची फसवणूक केली

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून वादळे, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकर्‍याच्या हातात सरकारी मदतीचा एक पैसादेखील पडलेला नाही. या सरकारने राज्यातील शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. शेतकर्‍याच्या या संतापात सहभागी होऊन त्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन असेल, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच राज्यात निसर्ग वादळामुळे वाताहत झाली. हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि पुढील किमान दहा वर्षे त्यांना उभे राहता येणार नाही अशी अपरिमित हानी झाली.

शेतकर्‍यास न्याय मिळालाच नाही

या शेतकर्‍यांकरिता ठाकरे सरकारने मदतीची जोरदार घोषणाबाजी केली. पण त्या मदतीचा पैसा वर्षानंतरही शेतकर्‍यांपर्यंत पोहोचला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यातच स्पष्ट झाले. मदत का मिळाली नाही याची माहिती घेतो, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री ठाकरे मुंबईत परतले; पण मंत्रालयाकडे मात्र फिरकलेच नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यास न्याय मिळालाच नाही, असा दावा त्यांनी केला. सरकारच्या या बेफिकीरीचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून पक्षाचे लाखभर कार्यकर्ते आंदोलन करतील, असे उपाध्ये यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरातील पंचगंगेच्या पातळीत २ फुटांनी घट

News Desk

रामनाथ कोविंद यांचा उद्धव ठाकरेंना

News Desk

अखेर भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरुन रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख केला दुरुस्त!

News Desk